मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

water resource management लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बावखळ - वसई तालुक्यातील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती

 ॥ श्री गणेशाय नमः ॥ वसई विरार हा पूर्वीपासूनच  हरित पट्टा म्हणून ओळखला जातो . सोनचाफा , तगर आणि इतर फुलशेती, केळी आणि नारळीच्या बागा, आणि इतर भाजीपाला ह्या पट्टयात अगदी विपुल प्रमाणात पिकतो .  पूर्वेला जिवदानीचा आणि बारोंडा देवीचा डोंगर, पश्चिमेला पंचवीसेक किलोमीटरचा समुद्र किनारा, उत्तरेला वैतरणेची खाडी आणि दक्षिणेला उल्हासची (वसईची) खाडी अशा भौगोलिक रचनेत वसलेला हा प्रदेश ! समुद्र आणि खाड्यांमधलं खारट पाणी  सिंचनासाठी वापराला सोयीस्कर नव्हतं . पावसाचं पडलेलं पाणी समुद्र जवळ असल्यामुळे अगदी सहज समुद्रात वाहून जात असे . आणि म्हणूनच सिंचनासाठी बावखळांची निर्मिती झाली . बावखळ बाव म्हणजे विहीर आणि खळ म्हणजे खडडा ! म्हणजेच पाणी साठवण्यासाठी विहीरी सारखा गोल खोलाकार खड्डा म्हणजे बावखळ .पण मग त्याला विहीरच का नाही म्हणत हे समजण्यासाठी आपल्याला बावखळांची रचना नीट समजून घ्यावी लागेल .   चित्र क्र. १ . बावखळांची रचना आणि वैशिष्ट्ये . चित्र क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे तळाशी बेसॉल्ट खडक सापडतो .बेसॉल्ट खडक हा भुजलधारक आहे . भुसभुशीत कडा ह्या नैसर्गिक उतार...

बारव - प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञान (श्री अमृतेश्वर महादेव , रतनवाडी, भंडारदरा )

॥ हर हर महादेव ॥ ऋषीचे कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये असं म्हणतात . पण भारतात नद्यांना मातृत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यांच्या उगमाशी संबंधीत मंदिरही उभारली जातात हे विशेष . असंच एक सुंदर मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीत आहे ज्याचं नाव आहे अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून प्रवरा नदी उगम पावते असं जाणकार सांगतात . चित्र क्रमांक १ . अमृतेश्वर महादेव मंदिर , रतनवाडी, भंडारदरा . चित्र क्रमांक २ . जलमग्न शिवलिंग , अमृतेश्वर महादेव . चित्र क्रमांक दोन मध्ये शिवलिंग पाण्यात बुडालेलं दिसतं . सर्वसाधारण पणे चारेक महिने ते पाण्यातच असतं . ह्याच संदर्भाने प्रवरा नदी इथून उगम पावते असं म्हणतात . चित्र क्रमांक ३ . अमृतेश्वर मंदिराची बारव (  पॅनारोमा ) . बारव म्हणजे पायविहीरीच . पण त्यांच जलव्यवस्थापन आणि स्थापत्य अगदी शास्त्रशुद्ध . मंदिराचा कळस जसा आसमंतात निमुळता होत जातो तशीच बारवही जमिनीत खोल जाताना निमुळती होते म्हणून त्यांना उपडी मंदिरे ( inverted temples )  सुद्धा म्हटलं जातं . बारा महिने पूर्ण गावाला पाणी पुर...