मुख्य सामग्रीवर वगळा

त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा

॥ हर हर महादेव ॥

वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर  सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल.



चित्र क्र १. सतीशिळेचं छायाचित्र.


चित्र क्र. २. सतीशिळेचं संपादीत छायाचित्र.


 चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा

 चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा


नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ.

कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ )

सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे. 

कप्पा क्र. २ वीरगळाच्या  उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेला हात ( चित्र क्र २ नारिंगी रंग )

स्वातंत्र्य पूर्व काळापर्यंत सती जाण्याची प्रथा होती.  सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पत्नीने त्याच्या चितेवर आत्मदहन करून घेणे. ( सदर प्रथा काळाच्या ओघात बंद झाली असल्याने त्यावर कोणतीही टिपण्णी म्हणजेच कमेंट करू नये ही वाचकांना नम्र विनंती ). जसं युद्धात वीरमरण आलं की स्वर्ग मिळे ही भावना समाजात रूढ होती तीच भावना सती जाणे ह्या चाली बद्दल होती. त्यामुळे वीराच्या चितेवर सती जाणं हे भाग्याचं समजलं जाई. सदर वीराची पत्नी सती गेली हे दर्शवण्यासाठी कोपरापासून दुमडलेला हात दाखवला आहे. हातावर ठळकपणे दिसणाऱ्या बांगड्या पत्नी सौभाग्यासह स्वर्गवासी झाली हे ठळकपणे दर्शवण्यासाठी आहेत.

कप्पा क्र. ३ वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( चित्र क्र. ४ )

हा टप्पा वीराच्या मृत्युनंतरचा प्रसंग दर्शवतो. सदर वीर हा मृत्युपश्चात शिवपिंडीची पूजा आणि आराधना करताना दिसतो. पाय दुमडून बसलेला नंदी, त्याच्या पाठीवरचं कुबड अगदी स्पष्ट दिसतं. वीराच्या पाठी त्याची पत्नी सुद्धा हात जोडून बसलेली दिसते. शिव आराधना करून त्यांना स्वर्गप्राप्ती झाली असं दर्शवले आहे.

कप्पा क्र. ४ सूर्य, चंद्र आणि कलश 

चित्र क्र २ मध्ये कलशाच्या खाली चंद्रकोर आणि संपूर्ण सूर्य कोरलेले दिसतात. यावत्चंद्रदिवाकरो  म्हणजेच जोवर आकाशात चंद्र सूर्य असतील तोवर यांची किर्ती टिकेल असा त्याचा अर्थ आहे. पण त्यावर शिलालेख नसल्याने लढाईचं कारण, वीराचं नाव आणि इतर बारकावे लक्षात येत नाहीत. सर्वात वर कलश काढलेला आहे. कलशाचा अर्थ सदर वीर दांपत्याला मोक्षपद मिळाला असा असतो. 


लोभ असावा !

राहुल अभ्यंकर, विरार.



चतुर्थमितीचे इतर लेख  
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...

विरगळ - Hero stone नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई )

                      ॥ श्री गणेशाय नमः ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् । तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥  भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. " आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात .  वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन क...